
Pahalgam terrorist attack: जम्मू, काश्मीर पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा शिकार झाला आहे. दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू आणि काश्मीर हादरली आहे. पहेलगाम मध्ये दहशतवाद्यांनी तेथील पर्यटकांवर मोठा हल्ला केला आहे. त्या हल्ल्यामध्ये अनेक पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. त्यातील दोन पर्यटकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर दहा पर्यटक आणि दोन स्थानिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दल काम करत आहे. आणि तेथील संपूर्ण परिसराला वेडा घातला आहे. त्या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.
दोन ते तीन दहशतवादी पोलिसांच्या गणवेशात होते. पर्यटकांना लक्ष करण्यासाठी त्यांनी हा हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी पहिले पर्यटकांची नावे विचारली त्यानंतर त्यांच्यावर गोळीबार केला. हल्ला केल्यानंतर गोंधळ उडताच दहशतवाद्यांनी पर्यटकांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू केले. त्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे.
Pahalgam terrorist attack: मंगळवारी या दहशत हल्ल्यात दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांचा जीव घेतला आहे. ही घटना साडेतीनच्या सुमारास अनंतनाथ जिल्ह्यातील पैलवान येथे झाली. क्या हाल यामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती सांगण्यात आली आहे. या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची संख्या वाढत चालल्याचे भीती समोर आलेली आहे. हा हल्ला दहशतवाद्यांनी बेसरण या गवताळ असणाऱ्या प्रदेशाजवळ केला. दहशतवादी संघटना द रेझीस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे. टीआरएफ ही लष्कर एक तय्यब या दहशतवादी संघटनेची संघटना आहे. पाकिस्तान मधील शेख सज्जाद गुल हा टी आर एफ चे प्रमुख आहे.
Pahalgam terrorist attack:
टी आर एफ ही दहशतवादी संघटना 2019 मध्ये सुरू करण्यात आली. 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू आणि काश्मीर मधून कलम 370 हटवताच ही संघटना संपूर्ण काश्मीरमध्ये सुरू करण्यात आली. मग त्यानंतर या दहशतवादी संघटनेने डझन बराच्या जवळ पास हल्ले केले. 2023 मध्ये बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा अंतर्गत टी आर एफ दहशतवादी संघटनेवर बंदी करण्यात आली. त्यानंतर पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय लष्करे तय्यब यांनी मिळून ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ या नवीन दहशतवादी संघटनेचा पाया रचला.(Pahalgam terrorist attack:)
“जम्मू आणि काश्मीरमध्ये 85 हजार हून अधिक डोमिसाईल जारी करण्यात आली आहेत. हे डोमेसाईल येथे स्थानिक लोकांना नाही तर बाहेरील लोकांना देण्यात आली आहे. याद्वारे जम्मू-काश्मीरची लोकसंख्या खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे दहशतवादी हल्ले जम्मू आणि काश्मीरमध्ये बेकायदेशीरपणे लोकांना बसवण्याच्या प्रयत्नाने परिणाम आहेत” असे टी आर एफ ने म्हंटला आहे.
Pahalgam terrorist attack: जम्मू आणि काश्मीर मध्ये टीआरएफ केलेल्या प्रत्येक हल्ल्यानंतर एक पत्र जारी करते. त्यानुसार पहेलगाम हल्ल्यातही दहशतवादी संघटनेने असेच एक पत्र जारी केले आहे. जम्मू काश्मीरमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांना डोमिसाईल जारी केला जात आहे. हा प्रयत्न जम्मू आणि काश्मीरची लोकसंख्या खराब करण्याचा आहे. जम्मू काश्मीर मध्ये स्थानिक नसलेले लोक तिथे येतात आणि स्वतःची पर्यटक म्हणून ओळख सांगतात आणि डोमेसाईल मिळवतात. मग तिथे जमीन ताब्यात घेण्याचा खेळ सुरू होतो. असे सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या पत्रात म्हटले आहे.