Pahalgam terrorist attack: पाकिस्ताननं अडवली भारताची हवाई जहाजांची वाट; आता विमानांसाठी मार्ग कोणता?

Pahalgam terrorist attack : बेलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाक बद्दल काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते. पहलगाम (Jammu Kashmir) दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने सिंधू जल करार थांबवला. त्यानंतर अगदी सीमेवरून होणाऱ्या व्यवहारापर्यंत सर्व गोष्टींवर निर्बंध आणले. त्यानंतर पाकही या सर्व गोष्टीवर उत्तर देण्याचे ठरवले आणि त्यावर उत्तर म्हणून असाच एक परिणाम घेतला आहे जिथे भारताशी असणार नातं जवळपास संपुष्टात आणण्यासाठी शेजारी राष्ट्रांनाही काही घोषणा केल्या.

पाकच्या नॅशनल सिक्युरिटी कमिटीने एनएससी (NSC) 1972 चा शिमला करार रद्द केला. इतक्यावरच पाक थांबला नाही तर भारतासाठी त्याने आपली विमानतळ आणि एअरस्पेसही (airspace) पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या एका बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेतला गेला. भारताने पाक बद्दल घेतलेल्या काही निर्णयाने पाकला चांगलाच घाव लागलेला दिसत आहे त्यामुळे पाकनेही भारताला दिवस नारी काही निर्णय घेतले आहेत.

पाकिस्तान निर्णय भारतावर कसा परिणाम होणार?

पाकने एअर बेस बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या निर्णयामुळे सर्वात जास्त परिणाम उत्तर भारताकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या उडानावर होताना दिसणार आहे. लखनऊ, चंदीगड, दिल्ली आणि अमृतसर यासारख्या शहरांमधून युरोप, अमेरिका आणि दुबईसह पश्चिम आशियाच्या दिशेने जाणारी विमाना आता गुजरात किंवा महाराष्ट्राच्या वाटेने अरबी समुद्राच्या दिशेने वळवण्यात येणार आहेत. ज्यामुळे प्रवाशांना थोडा त्रास सहन करावा लागणार आहे. कारण या निर्णयामुळे तब्बल 70 ते 80 मिनिटांनी प्रवासाचा आणि विमानाच्या वेळ वाढणार आहे.

70 ते 80 मिनिटांनी प्रवासाचा आणि विमानाचा वेळ वाढणार असल्याने भारताला इंधनासाठी चांगली रक्कम मोजावी लागणार आहे. पाकच्या या निर्णयानंतर आता भारतीय विमानांना इंधनासाठी अधिक रक्कम लागणार आहे. कारण जितका जास्त वेळ लागेल तितकेच जास्त इंधनही विमानांना लागेल. त्यामुळे विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना सुद्धा याचा चांगलाच फटका बसणार आहे. याच्या पहिले 2019 मध्ये अनुच्छेद 370 हटवल्यानंतर पाकचा एअर स्पेस बंद करण्यात आला होता. तेव्हाही भारतातील विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना जवळपास सातशे कोटी रुपयांचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला होता. त्यामध्ये एअर इंडियाला अधिक आव्हानांचा सामना केला होता. त्यामुळेच त्या गोष्टीचे परिणाम म्हणून विमानाच्या तिकिटांची किंमत खूपच वाढली होती. येत्या काही दिवसात अशाच काही गोष्टींचा सामना करावा लागू शकतो.

माहितीनुसार पाकिस्तान गतकाळात जेव्हा असा निर्णय घेतला होता, तेव्हा भारताला तोटा करून देण्याचा त्यांचा हेतू असूनही सर्वाधिक तोटा मात्र पाकिस्तानलाच सहन करावा लागला. आणि यावेळी सुद्धा तसेच घडण्याची शक्यता आहे. कारण यावेळी सुद्धा परिस्थिती काही वेगळी नाही. त्यावेळी पाकला एअर स्पेस बंद केल्याने 50 मिलियन डॉलर म्हणजे साधारणतः 400 कोटींचं नुकसान झालं होतं. यावेळी सुद्धा परिस्थितीत तशीच असेल. आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या पाकिस्तान आता त्यांचाच हा निर्णय नेमकं काय आणि कोणता धडा शिकवतो हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Leave a Comment